भगवद् दर्शनाची ओ ढ

ज्याच्या अंतःकरणात भगवंताच्या दर्शनाची ओढ आहे ना ती ओढ इतरांना जरी समजली नाही किंवा दाखवली जरी नाही तरी भक्ताची ती ओढ भगवान परमात्म्याला तरी नक्की कळते. त्या एका भगवंतापासून काही लपत नाही. आपल्या मनातील सर्वच्या सर्व भाव भगवंताला समजतात. भगवान परमात्मा हा मनकवडा आहे. त्याला सर्वांच्या मनातले जाणता येते. पण जर त्या भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा ओढ तुमच्या मनामध्ये असेल तर तो भगवान परमात्मा त्याची नोंद घेतो. त्या भगवंताकडे सर्वांची नोंद घेतली जाते. आपल्या अंतःकरणातील ओढ पाहून भगवान परमात्मा आपल्याकडे येतो. अन आपल्याला दर्शन देतो. भगवंताला भेटण्याची ओढ पण मात्र तेवढीच त्या प्रमाणात असली पाहिजे. आपल्या अंतःकरणातील भाव जर तेवढा प्रबल नसेल तर मग मात्र परमात्मा तेवढ्या लवकर प्रगट होणार नाही. भाव पण तेवढाच प्रबल असला पाहिजे. तेव्हाच आपल्याला भगवान परमातम्याची प्राप्ती होईल. हा महत्वाचा विचार आहे. _ गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷 चिंतनाची लिंक https://www.youtube.com/live/tJcd32mQlTU?feature=shar रामकृष्णहरी🙏🏻🌸🌷